आम्ही कोण?

कथाबोध

titan edge story

मुल्ला आणि कर अधिकारी

  • मुकुंद कुलकर्णी
  • 24.07.25
  • वाचनवेळ 4 मि.

मुल्ला नसरुद्दिन तलावाच्या काठाने जात होता. लोकांचा आरडाओरडा त्याच्या कानी आला. काय झालं असावं हे बघायला तो धावत तलावाकाठी गेला. बघतो तर गावाचा कर वसुली अधिकारी तलावात गटांगळ्या खात होता. पाय धुवायला गेला अन्‌‍ घसरून पडला. त्याला पोहता पण येत नव्हतं. त्यामुळे प्रसंग कठीण होता. गावकरी घाबरून कल्ला करत होते....

काय सांगता!

old readable script

भारतातील सर्वात जुनी वाचता येणारी लिपी कोणती?

  • मयूर पटारे
  • 29.05.26
  • वाचनवेळ 2 मि.

भारतात सांस्कृतिक, प्रांतिक आणि भाषिक वैविध्याप्रमाणेच लिपीचं वैविध्यही मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्या चलनी नोटेवर मागे १५ वेगवेगळ्या लिपींमध्ये रुपयाची किंमत लिहिलेली असते, हे याचं उत्तम उदाहरण.

वापरात नसलेल्या सिंधू, ब्राह्मी, खरोष्टी आणि वापरात असलेल्या देवनागरी, बंगाली-आसामी, गुरमुखी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम,...

gangotree homes advertisement
Abhay Bang Devendra Fadanvis Dilip Prabhavalkar Nilu Damale Prakash Amte Prithviraj Chavhan Sadanand Date Supriya Sule vaibhav mangle suhas palashikar sonali kulkarni sachin khedekar rangnath pathare prashant joshi prakash javdekar neelam gorhe muralidhar mohol chandrakant kulkarni bhushan gagrani bharat sasane ashok dhavale

शोधाशोध

व्हिडीओ

माध्यमांनी मुस्लिम समाजाचं राक्षसीकरण केलं?

मुस्लिमांबद्दल समाजामध्ये बरेच समज- गैरसमज आहेत. या समज- गैरसमजाच्या पलीकडे जाऊन एक मुस्लिम तरुण समाजसुधारणेचा विचार मांडतो आहे. ते आर्थिक कुर्बानी, जकात शिक्षणासाठी आणि बुरखा मुक्ती अभियानाच्या माध्यमातून ते समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्न करत आ

  • 06.07.26

ले

ऊस क्षेत्रातील कामगारांच्या समस्यांबाबत सहकारातील नेते गप्प का?

  • तुषार गायकवाड
  • 08.07.26
  • वाचनवेळ 9 मि.

महाराष्ट्राच्या विधानसभेतील २८८ आमदारांपैकी सुमारे ६० आमदार साखर कारखान्यांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जोडलेले आहेत. काहींच्या स्वतःच्या किंवा कुटुंबीयांच्या मालकीचे खासगी कारखाने आहेत, तर काही सहकारी कारखान्यांमध्ये प्रभावी सत्ता राबवतात. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि इतर भागात साखर हा केवळ उद्योग नव्हे, तर राजकीय सत्ता, आर्थिक प्रभाव आणि निवडणुकीतील हत्यार आहे. आधुनिक महाराष्ट्राचे निर्माते दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी सहकाराला चालना देणारी धोरणं आखली आणि प्रत्यक्ष अंमलात आणली. मात्र त्यांनी स्वतः मात्र सहकारसम्राट होवून खाजगी संस्थानिक राजकारणी होणं टाळलं. त्यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या इतर नेत्यांना यशवंतरावांचा राजकीय आदर्श जपता आला नाही.

सहकारी संस्था या आर्थिक संस्था आहेत, त्या संस्थांच्या माध्यमातून विकास साधला पाहिजे, या...

...पुढे वाचा

साम्राज्यांच्या लाटा आणि आजची अमेरिकी महासत्ता

  • देवेंद्र बंगाळे
  • 07.07.26
  • वाचनवेळ 9 मि.

इतिहासाचा एक विलक्षण स्वभाव आहे. तो स्वतःची पुनरावृत्ती तंतोतंत करत नाही; पण त्याच्या लाटा मात्र सारख्याच वाटतात. काळ बदलतो, चलनं बदलतात, तंत्रज्ञान बदलतं, सत्ताकेंद्रं बदलतात — पण मानवी समुहाचं मानसशास्त्र फारसं बदलत नाही. उत्कर्षाच्या काळात प्रत्येक व्यवस्थेला स्वतःची स्थिरता नैसर्गिक आणि कायमची वाटू लागते. आणि कदाचित तिथूनच बदलाची प्रक्रिया सुरू होत असते.

रोमन साम्राज्याच्या अखेरीच्या काळात रोम अजूनही जगाचं केंद्र वाटत होते. स्पेन समुद्रमार्गांवर राज्य करत होतं. डच साम्राज्याने व्यापार आणि वित्तीय व्यवस्थेची नवी व्याख्या लिहिली होती. ब्रिटिश साम्राज्याच्या प्रभावाखाली जगाचा नकाशाच बदलला. आणि आज अमेरिका — डॉलर, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, सैनिकी ताकद आणि वित्तीय व्यवस्थेच्या माध्यमातून — आधुनिक जगाच्या केंद्रस्थानी...

...पुढे वाचा

jan-2025-anubhav-add.webp

मुलाखत

कोकणाच्या विनाशकारी विकासाला आव्हान देणारी राखणदार यात्रा

कोकण आणि गोवा भागातील काही गावांमधून नुकतीच राखणदार यात्रा काढण्यात आली. निसर्ग आणि लोकसंस्कृतीविषयी सजग असलेल्या १८ जणांनी १२ गावांतून १२० किलोमीटरचा प्रवास करत ही यात्रा पूर्णं केली. स्थानिकांच्या आर्थिक, सामाजिक आणि नैसर्गिक संसाधनांच्या प्रश्नांवर चर्चा घडवणं हे या यात्रेचं उद्दिष्ट होतं. विकासाच्या नावाखाली कोकणाला ओरबाडू देणार नाही, असा निर्धार करत हे यात्रेकरून पुढच्या टप्प्यात कोकणातील समुद्र किनाऱ्यालगतच्या गावांत फिरणार आहेत. त्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते मल्हार इंदुलकर यांच्याशी साधलेला संवाद..


...पुढे वाचा

malhar indulkar rakhandar yatra
मल्हार इंदुलकर

अस्सल देशी शेफ : विष्णू मनोहर

  • आनंद अवधानी
  • 02.07.26
  • वाचनवेळ 11 मि.

‘विष्णुजी की रसोई' या रेस्टॉरंट्‌‍सच्या मालिकेमुळे आणि ‘मेजवानी परिपूर्ण किचन'सारख्या कार्यक्रमांमुळे विष्णू मनोहर यांचं नाव अनेकांना माहिती आहे. विष्णुजी हे अस्सल देशी शेफ (मराठीत आचारी किंवा बल्लवाचार्य) आहेत. त्यांचं वर्णन ‘अस्सल देशी' असं करण्यामागे कारण आहे. 1990च्या जागतिकीकरणानंतर आपल्याकडे परदेशी खाद्यपदार्थांची जबरदस्त लाट आली. ‘मॅकडोनाल्डस्‌‍', ‘डॉमिनोज', ‘पिझ्झा हट', ‘केएफसी', ‘सबवे'पासून ते ‘बरिस्ता' आणि ‘स्टार बक्स'पर्यंत अनेक रेस्टॉरंट्स देशभर उगवली. त्याचसोबत दाक्षिणात्य आणि पंजाबी पदार्थ देणाऱ्या हॉटेल्सचाही प्रसार झपाट्याने झाला. भारतीय पदार्थांसोबतच चायनीज, अमेरिकन, इटालियन, थाई आणि मेक्सिकन पदार्थ ठिकठिकाणी मिळू...

आमचे सहयोगी

maharogi seva samiti Techmosaic Digital Solutions Samakalin Prakashan Unique Features mkcl pitambari annapurna pariwar gangotri lokmanya

आमची शिफारस

  • योगेश जगताप
the great indian illusion

देशातील बँकिंग व्यवस्थेची विदारक वस्तुस्थिती मांडणारा माहितीपट

मुद्दा १ - २०१८ ते २०२५ या कालावधीत देशातील बँकांनी नागरिकांकडून सर्व्हिस चार्ज आणि पेनल्टी चार्जच्या माध्यमातून जवळपास ३५ हजार कोटी रुपये वसूल केले आहेत. यामध्ये अकाऊंटमध्ये मिनीमम बॅलन्स नसणं, एटीएमचा ठराविक मर्यादेपेक्षा अधिक वापर, अकाऊंट अॅक्टीव्ह नसणं, केवायसी वेळेत न कऱणं, अकाऊंट बंद करणं...

...पुढे वाचा

अनुभव

  • सुहास कुलकर्णी

गंगटोक आणि सिक्किम : काही नोंदी

तसं पाहिलं तर विंध्य पर्वतरांगेच्या दक्षिणेकडील भागात मी बराच फिरलो आहे. त्याशिवाय विंध्यच्या पश्चिमेकडील बराचसा गुजरात आणि पूर्वेकडचा बराचसा ओरिसा बघितला आहे. कधी निवडणुका बघण्यासाठी, कधी पर्यटनासाठी, तर कधी सर्वस्वी विनाहेतूने. शिवाय दिल्ली, उत्तराखंडही थोडा पाहिला आहे. पण जेवढा दक्षिणेकडे वावरलो आहे, तसं उत्तरेबाबत म्हणता येत नाही.

उत्तर भारताविषयी नाही म्हटलं तरी मनात एक अढी असल्यामुळे तिकडे उत्साहाने फिरावं असं अजून वाटलेलं नाही. पण ईशान्य भारतात जावं, फिरावं, तिथलं जगणं बघावं, लोकांशी बोलावं असं वाटत राहिलं आहे. आसामपासून मिझोरामपर्यंत फिरण्याचा प्लॅन अजून बाकी आहे, पण सुरुवात म्हणून नुकताच सिक्किमला जाऊन आलो. तिथे फार फिरलो असं नव्हे, पण येता-जाता जे दिसलं आणि...

...पुढे वाचा

वीकेंड स्पेशल

Select search criteria first for better results